ताटातुटीचे वर्तमान
ताटातुटीचे वर्तमान: शिकवण एकतेची! ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानार्जनाचा पेशा आवडीने,प्रामाणिकपणे करणारे शशिकांत शिंदे यांचा नावलौकिक आहे. विशेष म्हणजे त्यांची 'माणूसपण गारठलंय' ही कविता बालभारतीच्या इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात होती. यावरून कवी शिंदे यांची कवितेवरील, शब्दांवरील हुकमत आणि सामर्थ्य लक्षात येते. लेखक या नात्याने शशिकांत शिंदे यांच्या नावे पाच पुस्तके जमा आहेत. त्यांचा 'ताटातुटीचे वर्तमान' हा विविध विषयांवरील काव्य असलेला संग्रह वाचण्याचा योग आला. अक्षर मानव प्रकाशन, पुणे यांनी अत्यंत दर्जेदार स्वरूपात हा संग्रह प्रकाशित केला आहे. संग्रहाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आणि आशय स्पष्ट करणारे आहे. या कवितासंग्रहात शंभरपेक्षाही अधिक आशयघन कवितांचा समावेश केला आहे.बहुतांश कविता ह्या सामाजिक जाणिवांवर आधारित आहेत. कळतनकळत बिघडत चाललेल्या सामाजिक घडामोडींवर परखड भाष्य करताना कवी शिंदे यांची लेखणी डगमगत नाही. म्हणूनच कवी शशिकांत शिंदे 'कवितेसाठी' या काव्यात उद्विग्न होऊन लिहितात... दहशतवादाच्या विरोधात ज्यांनी शस्त्र उपसले आणि जे शहीद झाले त्यांच्...